बेळगाव : शहरातील विविध दलित संघटना आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन गांभीर्याने आचरण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री मुनियप्पा, मंत्री नागेंद्र, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना मल्लेश चौगुले यांनी, डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच बहुजन समाजाला न्याय मिळाला आहे. म्हणूनच आज प्रत्येक जण ताठ मानेने वावरू शकत आहे. थोर नेत्यांच्या पुण्यतिथी व जयंती यांचे केवळ आचरण करून चालणार नाही तर त्यांचे विचारही आपण अंगीकारले पाहिजेत, असे ते म्हणाले. याप्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Articleमहापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांना अभिवादन
Next Article पत्रकार रमेश हिरेमठ यांना पितृशोक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









