रत्नागिरी प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री येथे भरधाव कंटेनर उलटून चालक जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातात पोल तुटून पडल्याने परिसरातील नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. मात्र वांद्री बाजारपेठ येथील शाळा सुदैवाने बचावली. अन्यथा मोठे नुकसान झाले असते.
संगमेश्वरहून गोव्याच्या दिशेने (एमएच 46, एच 1470) हा कंटेनर भरधाव वेगाने चालला होता. वांद्री येथील उतारावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याकडेला असलेल्या विद्युत पोलासहित उलटला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. अपघाताच्या आवाजाने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील ग्रामस्थांनी लगेचच कंटेनर चालकाला वांद्री येथील पाथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र कंटेनर उलटल्यानंतर पूर्ण पाथमिक शाळेच्या काही अंतरावरच तो थांबल्याने शाळा मात्र बचावली. अन्यथा शाळेचे मोठ्या पमाणात नुकसान झाले असते.अपघातात विद्युत पोल उद्ध्वस्त झाल्याचे कळताच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.संगमेश्वर पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल होत आहेत. या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.









