त्रिशूर : केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्यावर काँग्रेसने मंगळवारी गंभीर आरोप केले आहेत. गोपी यांनी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातील मतदारयादीत स्वत:चे नाव सामील करविण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने पोलिसांकडे तक्रारही नोंदविली आहे. माजी खासदार टी.एन. प्रतापन यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि गोपी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. सुरेश गोपी यांनी आपण त्रिशूरमध्ये सलग 6 महिने एकाच घरात राहिलो होतो असा खोटा दावा अधिकाऱ्यांसमोर केला होता. याचमुळे त्यांचे नाव स्थानिक मतदारयादीत जोडले गेले होते. परंतु सुरेश गोपी हे त्या घरात 6 महिने राहिले नव्हते. गोपी आणि त्यांच्या परिवाराच्या 11 सदस्यांची नावे अंतिम मतदार यादी जारी झाल्यावर जी पुरवणी यादी तयार झाली, त्यात जोडली गेली होती.
Previous Articleटेस्लाची दिल्लीत शोरुम सुरु, मुंबईनंतर दुसरी शोरुम
Next Article दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्याचा बजाजला बसला फटका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









