बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला तरी शहरातील विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. विशेषत: नार्वेकर गल्ली, शहापूर भागामध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत राबविण्यात आलेली कामे अर्धवट असल्याने ती प्रथमत: पूर्ण करावी, अशी मागणी नार्वेकर गल्ली, शहापूर येथील बालगणेश उत्सव मंडळातर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. गटारी व रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे गणेशमूर्ती आणताना व विसर्जन करतानाही अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी ही विकासकामे पूर्ण करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने या परिसरातील विकासकामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी सागर पाटील, महादेव पाटील, विराज मुरकुंबी यांच्यासह इतर उपस्थित होते.
Previous Articleकणबर्गी रोडवरील ‘त्या’ हॉटेलच्या पाठीमागच्या समस्या सोडवा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









