बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या सावगाव गावातील गटारींच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाचे पाणी व्यवस्थितरीत्या वाहून जावे यासाठी गटारीमध्ये साचलेला केरकचरा काढण्यात येत आहे. गटारीबाहेर टाकलेल्या कचऱ्याची बुधवारी उचल करण्यात आल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे. सावगावातील रामदेव गल्ली या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटारीत मोठ्या प्रमाणात केरकचरा तुंबला होता. गतवर्षीच मुख्य गटार बांधण्यात आली असून, ती नाल्याला जोडण्यात आली आहे. मात्र, सदर गटारीमध्ये बांधकामाचे साहित्य, माती, लाकडे व इतर केरकचरा पडल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण झाले होते. गावातील इतर गल्लीतील गटारींची यापूर्वीच सफाई केली आहे. मात्र, मुख्य गटारीची स्वच्छता न झाल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळे येत होते. त्यामुळे ग्रामपंचायतीचे अध्यक्ष डॉ. वाय. एम. पाटील यांनी मुख्य गटार स्वच्छ करण्याची सूचना केल्याने गेल्या आठ दिवसांपासून सफाईचे काम हाती घेतले आहे. कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीतून भरून नेला जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
Previous Articleखानापुरातील मारुतीनगरमधील गटारीचे काम अर्धवट
Next Article लालवाडी भागात पावसाच्या लोंढ्यामुळे शेतात पडले खड्डे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









