सांखळी : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तसेच प्रेक्षणीय स्थळ म्हणून देशभरात परिचित असलेल्या हरवळे ऊद्रेश्वर देवस्थान परिसरातील ओहळात मानवनिर्मित कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र अस्वछता निर्माण झाली आहे. संबंधित खात्याने ओहळाची पाहणी करून तो पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करावा, अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या कांही वर्षांपासून या ओहळची स्वच्छता करण्याची वारंवार मागणी केली जात आहे. मात्र संबंधित खात्याचे अधिकारी याकडे दुलक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतून होत आहे. सुपाची पूड येथील साकवाखाली मोठ्याप्रमाणात कचरा फेकला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याची सांखळी पालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी लक्ष देऊन त्वरित स्वछता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. वरचे हरवळे येथून ऊद्रेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र ठिकाणी जाणाऱ्या ओहळात मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात कचरा फेकला जात असल्याने ओहळात कचऱ्याचे सम्राज्य दिसत आहे. पावसाळ्यात या ओहळाचे पाणी हरवळे येथील धबधब्याच्या ठिकाणी जात असल्याने हा ओहोळ पावसाळ्dयापूर्वी स्वच्छ करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सुपाची पुड येथे छुपा कॅमेरा लावून कचरा फेकणाऱ्यांना पकडून दंडात्मक कारवाई करावी, अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे.
Previous Article‘राकसकोप’ पाणी पातळीत घट
Next Article गोमंतकीय मिरचीच्या विक्रीत घट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









