बेळगाव : आरसीबी संघाच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत निष्पाप 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला राज्य सरकार जबाबदार असून, आपली चूक लपविण्यासाठी चालढकल करत आहे. सरकारने या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी शहर भाजपच्यावतीने करण्यात आली. यावेळी राणी चन्नम्मा सर्कलमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकार आपली चूक लपविण्यासाठी सदर घटना दुसऱ्याच्या माथी थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे सरकारची मानसिकता यातून दिसून येते, असा आरोपही करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय पाटील, उज्ज्वला बडवाण्णाचे, गीता सुतार, सुभाष पाटील, विजय कोडगनूर, युवराज जाधव, महांतेश कवटगी, प्रसाद देवरमनी, शिल्पा केकरे, अशोक थोरात, विनोद लंगोटी, मुरगेंद्रगौडा पाटील, अॅड. हणमंत कोंगाली यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleहेलिपॅडवर पोहोचण्यास उशीर झाल्यानेच खासदार बचावले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









