सातारा प्रतिनिधी
धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाणात वाढ आहे . त्यामुळे धरणा मध्ये पाण्याची आवक 4500 क्युसेक आहे.
धरणाची पाणी पातळी. 810.32 मी झालेली असून निर्धारित मंजुर जलाशय पाणी पातळी शेड्युल ( ROS) नुसार पाणी पातळी राखणे करिता बलकवडी धरणातून सध्या सुरू असलेला 1500 क्युसेकचा विसर्ग वाढवून 3500 क्युसेक करण्यात येणार आहे. पाणी धोम धरणा मध्ये सोडणे चालु आहे. तसेच बलकवडी धरणामध्ये पाण्याच्या आवकमध्ये लक्षनीय वाढ होत असल्याने आज दुपारी ३ वा.पुर्वी देखिल आगाऊ सूचना देऊन पाणी सोडले जाऊ शकते.
त्यामुळे बलकवडी धरणा खालील मौजे बलकवडी, परतवडी, कोढवली नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील ग्रामस्थांनी नदी पात्रात जावू नये . अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आहेत.
कुडाळी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कुडाळी मध्यम प्रकल्प- महू धरण पाणलोट क्षेत्रामधील संततधार पावसामुळे महू धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरु होऊ शकतो.
कुडाळी नदी काठावरील सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की, नदी पात्रामध्ये प्रवेश करु नये. तसेच पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये









