साखळी : साखळी पंचक्रोशी शिवप्रेमी समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक निमित्त साखळीत रात्री ठजय शिवाजी जय भवानीठ च्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने साखळीतील वातावरण शिवमय बनले होते. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींची उपस्थिती होती. साखळी पंचक्रोशी शिवप्रेमी समितीतर्फे विठ्ठलापूर साखळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांकडून साखळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रमुख वत्ते प्रा. विनय मडगावकर, दत्ताराम चिमुलकर, संजय नाईक, शिवानंद बाक्रे, राजेश गायतोंडे व इतरांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच गोव्यात त्याकाळी पोर्तुगीजांमार्फत होण्राया हिंदू धर्मियांच्या धर्मांतरणावर नियंत्रण आले. गोमंतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान मोठे आहे. त्यांनी गोव्यात स्वारी करून गोव्याला मोठे नाव दिले आहे. असे यावेळी प्रा. विनय मडगावकर यांनी म्हटले. व गोव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान यावर मार्गदर्शन केले. विठ्ठलापूर येथून साखळीत मिरवणूक दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष करण्यात आला. यावेळी बाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शुभम गावस हे सहभागी झाले होते. राजेश गायतोंडे यांनी आभार मानले.
Previous Articleशिंगाडी कुटुंबियाच्या मुलांना सरकारी नोकरीची गरज
Next Article शिवरायांनी लोकशाही तत्वावर निर्माण केले स्वराज्य
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









