सावंतवाडी : प्रतिनिधी
नागरिक आमच्याकडे काम घेऊन येतात याचं कारण नगरपरिषदेमध्ये होत असलेला विलंब आहे. सावंतवाडीतील नागरिक सुजाण आहेत .अधिकारी आहेत म्हणून लोकांचे अपमान करू नका . एका छोट्या घरासाठी डेव्हलपमेंट चार्जेस भरूनही दोन दोन महिने परवानगी हातात मिळत ना. ही याचा अर्थ काय? या कामासाठी आम्ही जर फोन लावला तर तुम्हाला राजकारण वाटतं. वैयक्तिक घरांच्या परवानगीची कामे होणार नाही तर काय बिल्डरच्या कामासाठी तिथे बसलायत का ? लोक आमच्याकडे विश्वासाने येतात कारण आमच्याकडून काम होतील हा आमच्यावरील असलेला त्यांचा विश्वास आहे. गेले 25 वर्षे या नगर परिषदेमध्ये मध्ये नगरसेवक म्हणून काम केलं आहे. त्यातील साडेचार वर्ष उपनगराध्यक्ष तसेच पुढील आठ वर्ष नगराध्यक्ष म्हणून या शहराचा कारभार सांभाळला आहे. चुकीचं काम करा म्हणून आम्ही कुठच्याही अधिकाऱ्यावरती आजतगायत दबाव टाकलेला ना. जनतेच्या कामासाठी हजार वेळा फोन करू. नियमात असलेली कामे वेळेत होणे हा सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे. आम्हाला निष्पक्षपाती कामाची तुमच्याकडून अपेक्षा आहे . प्रत्येक अभ्यंगतांच काम करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आम्ही पाठवलेल्या अभ्यगतांचे अपमान हा आमचा अपमान आम्ही समजू. अपमान कधीही सहन केला जाणार नाही. निष्पक्ष काम करा कुणाचेही शाखाप्रमुख म्हणून काम करू नका . उद्या नगरपरिषदेमध्ये आमचीही सत्ता असू शकते. मंत्रीच म्हणत असाल तर आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्री आमचे मित्र आहेत. तसेच केंद्र मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्री अत्यंत जवळचे आहेत .अनेक मुख्याधिकारी आमच्या कारकिर्दीमध्ये मध्ये होऊन गेलेत .त्यांच्याकडे आमच्या कामाची जरा चौकशी करा. जास्त खोलात जाऊ नका. आंदोलन करून आमचं नेतृत्व उभं राहिलं आहे. तुम्ही कार्यभार सांभाळल्यानंतर शहराच्या अवस्थेमध्ये भर पडलेली आहे. कुठचाही धोरणात्मक निर्णय तुम्ही खुर्चीत बसल्या नंतर घेऊ शकलेला नाही. शहरांमध्ये विविध ठिकाणी कचरा साठलेला दिसत आहे. नालेसफाईचे काम एक महिना होऊन गेला तरी जैसे थे आहे, गटार सफाई झालेली नाही. आपत्कालीन कक्षामध्ये कोणीही नसतं. कार्यालयीन अव्यवस्थेमध्ये सुधारणा करू शकलेला नाही हे तुमचं अपयश आहे, फार जास्त खोलात जात नाही असा संताप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला आहे.









