वाळपई : भिंरोडा पंचायत क्षेत्रातील म्हादई या ठिकाणी शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून जंगल व काजू बागायतीचे मोठ्या प्रमाणान नुकसान झाले. दोनच दिवसांपूर्वी अडवई येथे काजू बागायतीला आग लागण्याची घटना घडली होती. दोन दिवसांनी भिरोंडा म्हादई येथे तशीच घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. आगीची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुपारची वेळ व जोरदार वारा असल्याने आग मोठ्या प्रमाणात फोफावली. त्यामुळे ताबडतोब वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेशी कळविल्यानंतर दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याच्या कामाला सुऊवात केली. सुमारे दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे. मात्र यातून जंगल संपत्ती व काजू बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसानंतर पुन्हा एकदा याच भागामध्ये अशा प्रकारे आग लागण्याचा प्रयत्न प्रकार खरोखरच दुर्दैवी स्वरूपाचा आहे. अज्ञात इसमाकडून या भागामध्ये आग लावण्याचे प्रकार होऊ लागल्याचे संशय अग्निशामक दलाच्या यंत्रणेने व्यक्त केलेला आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच सरपंच उदयसिंग राणे यांनी तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधून तातडीने बोलावून घेतले. या घटनेचा पंचनामा केल्यानंतर नुकसानीचा आकडा स्पष्ट होणार असून सदर प्रक्रिया लवकर हाती घेण्यात येणार असल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले.
Previous Articleनेहरु ओलेकार यांची आमदारकी रद्द
Next Article पेडणे पाणीप्रश्नी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









