कर्नाटकातील पहिलीच शस्त्रक्रिया, सांगोल्याच्या 75 वषीय वृद्धेला जीवदान : हृदयरोगतज्ञ डॉ. दीक्षित यांच्यासह टीमचे कौतुक
प्रतिनिधी /बेळगाव
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱया महा रोहिणीची निष्क्रिय झालेली झडप एओर्टिक व्हॉल्व (टावी-कॅरोटीड आर्टरी) बदलण्यात अरिहंत हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे. अत्यंत गुंतागुंतीची ही कर्नाटकातील पहिली आणि भारतातील दुसरी कॅरोटीड आर्टरी (टावी) शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित आणि त्यांचे सहकारी डॉ. अनमोल सोनवे, डॉ. प्रभू हलकट्टी यांनी केली आहे.
‘टावी’ म्हणजेच ट्रान्सकॅथेटर कॅरोटीक वॉल्व इम्प्लांन्टेशन ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असून या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाची खराब झालेली महा रोहिणीची झडप बदलण्यास मदत होते. येथील अरिहंत हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार करणे शक्मय झाले आहे.
सामान्यपणे ही प्रक्रिया पायाच्या धमनी (ग्रोईन वेसेल्स) द्वारे केली जाते. परंतु महिलेच्या पायाच्या धमन्या खूपच बारीक होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी कॅरोटीड आर्टरीद्वारे (मेंदूला रक्तपुरवठा करणारी वाहिनी) शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारला. या शस्त्रक्रियेसाठी 75 वय असूनही महिलेने कोणतेही दडपण न घेता योग्य तो प्रतिसाद दिला. दरम्यान आजपर्यंत अशाप्रकारची भारतात कॅरोटीड आर्टरीद्वारे (मेंदूला रक्तपुरवठा करणारी वाहिनी) एकच शस्त्रक्रिया झाली होती. आता दुसरी शस्त्रक्रिया अरिहंत हॉस्पिटलमध्ये पार पडली. कर्नाटकातील अशाप्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 48 तासांत महिलेला डिस्चार्ज दिला असून, महिलेची प्रकृती स्थिर आहे.
महाराष्ट्रातील सांगोला शहरातील 75 वषीय सिंधुबाई हरिभाऊ पोरे या महिलेवर तब्बल एक ते दीड तास आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यात आले. सदर महिलेला श्वासोच्छवासाचा मोठा त्रास होत होता. मात्र सदर महिलेवर ओपन हार्ट सर्जरी करणे धोक्मयाचे होते. ही बाब ध्यानात घेऊन डॉ. अनमोल सोनवे, डॉ. एम. डी. दीक्षित, डॉ. प्रभू हलकट्टी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अंबरिश नेर्लीकर यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने कर्नाटकातील पहिली व भारतातील दुसरी ‘टावी’ ही शस्त्रक्रिया 1 नोव्हेंबर रोजी यशस्वीपणे पार पाडली.
‘टावी’ म्हणजे काय?
ट्रान्सकॅथेटर कॅरोटीक वॉल्व इम्प्लांटेशनमध्ये रुग्णाच्या पायातील रक्तवाहिनीद्वारे महा रोहिणीत (धमनी) नळी टाकण्यात येते. महा रोहिणीच्या झडपेपर्यंत नेऊन त्याद्वारे झडप मोठी करून नवीन झडप बसविण्यात येते. फक्त पिन होल म्हणजेच 1.5 ते 2.0 सें.मी. छिद्राद्वारे झडप बदलली जाते. प्रामुख्याने रुमॅटिक हार्ट ते संधीवातामुळे होणारे झडपांचे आजार व वयोमान वाढल्याप्रमाणे कॅल्शियम आणि फायब्रोसिस यामुळे होणारे आजार अशा दोन पद्धतीच्या झडपांचे आजार आढळून येतात. आज झडपांचे आजार वाढल्यामुळे ती झडप ओपन हार्ट सर्जरीद्वारे बदलणे शक्मय आहे. मागील दहा वर्षांमध्ये महा रोहिणीची जी झडप आहे, त्या झडपेचा आजार आज कोणतीही ओपन हॉर्ट सर्जरी न करता एका छोटय़ाशा नळीद्वारे झडप बदलता येऊ शकते. मागच्या दहा वर्षात हे तंत्रज्ञान फार चांगल्या पद्धतीने विकसित झालेले आहे. सुरुवातीला ज्यांचे हृदय व्यवस्थित काम करत नाही, ज्यांना बरेच आजार आहेत, अशा रुग्णांमध्ये पिन होल सर्जरी व वॉल्व बदलणे शक्मय होत असे. आज नवीन तंत्रज्ञान, नवीन कॅथेटर, नवीन झडप, आकार कमी झाल्यास महा रोहिणीची झडप नळीद्वारे बदलता येते, असेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
अरिहंत हॉस्पिटलचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व संचालक अभिनंदन पाटील यांनी रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस करून तब्बेतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच या शस्त्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाचे कौतुक केले.
महानगरात जाण्याची गरज नाही : डॉ. दीक्षित
याबाबत डॉ. एम. डी. दीक्षित म्हणाले, अशा प्रकारची शस्त्रक्रिया समाजासाठी वरदान आहे. शस्त्रक्रियेसाठी जास्त जोखीम असलेल्या रुग्णांना आता मोठय़ा महानगरात जाऊन उपचार घेण्याची गरज नाही. बेळगाव येथे अरिहंत हॉस्पिटलमध्ये ही जीवनरक्षक शस्त्रक्रियेची सुविधा प्रदान करताना आम्हाला अभिमान आणि आनंद वाटत असून याद्वारे आम्ही कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील रुग्णांना ही जीवनरक्षक सुविधा देऊ शकणार आहोत, असे त्यांनी सांगितले.









