बेळगाव : शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून सोमवारी काही ठिकाणी कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यात आली. भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे सर्वसामान्य जनता अक्षरश: मेटाकुटीला आली आहे. ही कुत्री अचानकपणे हल्ला करत आहेत. त्यामुळे अनेकजण जखमी होत आहेत. काहीजण मात्र कुत्र्यांना खाऊ घालणे, अन्न घालणे असे करत आहेत. त्यामुळे आणखी कुत्र्यांची संख्या काही ठिकाणी वाढत आहे. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. सोमवारी विविध भागांमध्ये कुत्री पकडण्यात आली. एकूण सात कुत्र्यांना पकडून नसबंदी केंद्रामध्ये पाठविण्यात आले. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. तेव्हा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. जनतेनेही यासाठी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Previous Articleबैलहौंगल येथे जनता दर्शनला उत्तम प्रतिसाद
Next Article जिल्हा प्रशासनाकडून अधिवेशनाच्या तयारीची लगबग
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









