बेळगाव : हलगा-मच्छे बायपासच्या कामाला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा विरोध झुगारून काम सुरू ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सोमवारी हलगा गावापासून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री, तसेच पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पावसामुळे बायपासचे काम मागील तीन महिन्यांपासून बंद होते. मे अखेरपासून ऑक्टोबर पहिल्या आठवड्यापर्यंत पावसामुळे काम बंद होते. काहीशी उघडीप मिळाल्यानंतर शुक्रवारपासून कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु पहिल्याच दिवशी हलगा येथील शेतकऱ्यांनी विरोध करून कामगारांना हुसकावून लावले. त्यामुळे तेथून काढता पाय घेत इतर ठिकाणी काम सुरू ठेवण्यात आले होते. सोमवारी शेतकऱ्यांचा विरोध झाला असून जेसीबी, तसेच यंत्रसामग्रीद्वारे कामाला सुरुवात करण्यात आली. पावसामध्ये वाढलेले गवत बाजूला काढून माती टाकण्यात येत होती. मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु जोवर झिरो पाँईंट निश्चितीच्या खटल्याचा निकाल लागत नाही, तोवर काम करू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
Previous Articleतिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्यासाठी आंदोलन
Next Article खानापूर तालुक्यात सहा गावात घरफोडी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









