बेळगाव : हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुहास शेट्टी यांची नुकतीच मंगळूर येथे हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ भाजप महानगर उत्तर विभागाच्यावतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. राणी चन्नम्मा चौक येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्र्यांना पूर्णत: अपयश आले आहे. केवळ एकाच समाजाच्या विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे. यामुळे हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या होत असून याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. सुहास शेट्टी यांना हल्ल्यापूर्वी सोशल मीडियातून धमक्या देण्यात आल्या होत्या. पोलिसांमध्ये तक्रार करूनदेखील कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी महिला मोर्चाच्या उज्ज्वला बडवाण्णाचे, शिल्पा केकरे, राजकुवर पावले यांच्यासह महिला मोर्चाच्या सदस्या उपस्थित होत्या.
Previous Articleजिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी यंदा वाढणार हिरवळ
Next Article ट्रॅफिक सिग्नलवर बॅनर लावण्याची आगळीक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









