बेळगाव : बेळगुंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सामाजिक वनीकरण विभागामार्फत लावण्यात आलेल्या झाडांना अज्ञातांनी आग लावली. त्यामुळे बरीचशी झाडे जळून खाक झाली आहेत. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकीकडे खात्यामार्फत झाडे लावून संवर्धन केले जात आहे तर दुसरीकडे समाजकंटकांमुळे खात्याला फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे वन विभागाने आता कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यादरम्यान हजारो रोपांची लागवड केली जाते. यंदादेखील विविध गावांमध्ये 30 हजाराहून अधिक रोपांची लागवड झाली आहे. याबरोबरच खुल्या जागा, रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमी आदी ठिकाणी रोप लागवडीला प्राधान्य दिले जाते. बेळगुंदीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात खात्यामार्फत रोप लागवड करण्यात आली होती. शिवाय समाधानकारक पावसामुळे रोपे बहरून आली होती. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे ही रोपे जळून खाक झाली आहेत.
Previous Articleसुळगे (ये.) येथे गवतगंज्यांना आग
Next Article मलप्रभा कारखान्याची नाहक बदनामी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









