बेळगाव : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या शक्ती योजनेंतर्गत 500 कोटी महिलांनी प्रवास केला आहे. ही योजना यशस्वी झाल्याने बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात काँग्रेसच्यावतीने नारी शक्ती उत्सव साजरा करण्यात आला. आमदार असिफ सेठ व काँग्रेस नेते विनय नावलगट्टी यांच्या उपस्थितीत महिला प्रवाशांचे पुष्प व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी परिवहन मंडळाकडून बस सजवून पूजन करण्यात आले. यावेळी आमदार सेठ म्हणाले, काँग्रेस सरकारने पंचहमी योजनांच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोठा लाभ मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने महिलांसाठी भरीव कामगिरी केली असून मोफत बसप्रवासाचा लाभ मिळवून दिला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 500 कोटी महिलांनी मोफत प्रवास केला असून राज्य शासनासाठी ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleभातरोप मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव
Next Article यंदे खूट-ध. संभाजी चौकापर्यंत पुन्हा बॅरिकेड्स
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









