पणजी : दारूच्या नशेत जीवघेणे अपघात होण्याच्या घटना राज्यात वाढल्याने वाहतूक पोलिसांनी आता आपला मोर्चा बारकडे वळविला आहे. मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांना दंड देण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नवी युक्ती काढली असून रात्रीच्या वेळी गर्दी होणाऱ्या मद्यालयाच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मद्यपी वाहन चालकांवर तेथे कठोर कारवाई केली जाईल, असे वाहतूक पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. बाणस्तारी येथे झालेल्या अपघातात मद्यपी वाहनचालकाने तिघांचे नाहक बळी घेतल्याच्या पाश्वर्भूमीवर जनतेमध्ये संतापाची भावना आहे. पोलीस कारवाई करीत नसल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे. नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनातही हा विषय गाजला होता. या पाश्वर्भूमीवर पोलिसांनी आता आपला मोर्चा बारकडे वळविला आहे.
Previous Articleऔरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने पुण्यात इंस्टाग्राम धारकावर गुन्हा
Next Article भाऊसाहेब बांदोडकरांची आज 50 वी पुण्यतिथी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









