पणजी : हवामानातील बदल, खवळलेला समुद्र आणि मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यामुळे यापुढे समुद्रकिनाऱ्यांवर पोहण्यासाठी, आंघोळीसाठी बंदी घातली आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील जलक्रीडाही स्थगित करण्यात आल्या आहेत, असे ‘दृष्टी’ मरिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन अवस्थी यांनी सांगितले आहे. मुसळधार पाऊस आणि उंच लाटा अपेक्षित असल्याने, लोकांना समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर लाल झेंडे लावण्यात आले आहेत. संबंधित क्षेत्र पोहण्यासाठी योग्य नाही, असे बजावून पाण्यात जाण्याची मनाई केली आहे. समुद्रकिनाऱ्यांवर तैनात असलेली जीवरक्षकांची टीम हवामानाचा समुद्रावर कसा प्रभाव पडतो यावर लक्ष ठेवून आहे. खराब हवामानात बचावकार्य करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लोकांनी किनाऱ्यावरील खडकाळ भागात जाणे टाळावे. समुद्रकिनाऱ्यांलगतच्या टेकड्यांवर जाणे टाळावे. पावसाळ्यात हे पट्टे निसरडे बनल्याने धोकादायक मानले जातात. लाटांची उंची, तीव्रता आणि त्यांची वारंवारता खूप जास्त असते. रविवारी वागातोर समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढताना उत्तर प्रदेशातील 22 वर्षीय पर्यटक बुडाला होता.
Previous Articleयेत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 जागा मिळणार
Next Article आजपासून गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









