मालोजी अष्टेकर यांचे प्रतिपादन : बॅरिस्टर नाथ पै यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली
प्रतिनिधी/ बेळगाव
भारताचे थोर सुपुत्र, माजी खासदार बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहापूर येथील बॅ. नाथ पै चौकात आदरांजली कार्यक्रम आयोजित करून नवीन फलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात विनय याळगी व रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते बॅ. नाथ पै यांच्या फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक नेताजी जाधव तर वक्ते म्हणून माजी महापौर मालोजी अष्टेकर उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, अंकुश केसरकर, शुभम शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुऊवातीस नेताजी जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. त्याचबरोबर बॅ. नाथ पै यांचा सीमाभागाशी संबंध कसा होता, याचे विवेचन केले.
यावेळी बोलताना विनय याळगी यांनी बॅ. नाथ पै यांच्याविषयी बोलताना सांगितले की, नाथ पै हे याळगी घराण्याचे एक सदस्यच होते. बेळगावात त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या सीमाप्रŽातील सहभागाची माहिती दिली. 17 जानेवारी 1971 या दिवशी हुतात्मादिनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. या सर्व प्रसंगांचे वर्णन त्यांनी कथन केले.
याप्रसंगी बोलताना माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी बॅरिस्टर नाथ पै आणि बेळगाव यांचा असलेला संबंध याचे सविस्तर विवेचन करून बॅरिस्टर नाथ पै यांच्यावर इंदिरा गांधींनी महाजन अहवालावेळी सोपविलेली जबाबदारी आणि बॅरिस्टर नाथ पै यांचे लोकसभेतील कार्य याविषयी त्यांनी माहिती दिली.
एक अत्यंत हुशार आणि कर्तबगार खासदार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे भाषण सुरू झाले की लोकसभेत सर्व खासदार आणि मंत्री त्यांचे भाषण मनपूर्वक ऐकत असत, असे ते म्हणाले. सीमाप्रŽाविषयी त्यांची असलेली कळकळ त्यांच्या शेवटच्या हुतात्मा दिनी दिसून आली, असे ते म्हणाले. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. अमृत भाकोजी यांनी आभार मानले.









