धूळ,माती,तसेच रोजच्या प्रदूषणामुळे आपल्या त्वचेचे खूप नुकसान होते. सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांच्या प्रभावामुळे, त्वचेचे झपाट्याने नुकसान देखील होते. परिणामी त्वचा निस्तेज दिसायला लागते. मग यासाठी बऱ्याच महिला फेशिअल करून घेतात. पण काही लोकांची समस्या असते की फेशिअल केल्यावरही त्यांच्या चेहऱ्यावर चमक येत नाही आणि फायदाही होत नाही. पण आपल्या काही चुकांमुळे फेशिअलचा प्रभाव कमी होतो.यामुळे फेशिअल केल्यानांतर कोणत्या चुका टाळायला हव्या हे आज जाणून घेऊयात.
फेशिअल केल्यानंतर लगेच उन्हात जाणे टाळा. फेशियल केल्यानंतर त्वचा अधिक नाजूक होते आणि सूर्यप्रकाश, धूळ किंवा इतर घाण तिच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
फेशिअल केल्यानंतर चेहऱ्याला पुन्हा-पुन्हा स्पर्श केल्यास हातांचे इन्फेक्शन त्वचेपर्यंत पोहोचते आणि पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे फेशियल केल्यानंतर चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळा.
फेशिअलनंतर लगेच मेकअप केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाणार असाल तर दोन ते तीन दिवस अगोदर फेशिअल करून घ्या. असे केल्याने, फेशिअल नंतर उघडलेली छिद्रांचा मेकअपच्या रसायनांपासून बचाव होऊ शकतो आणि तुम्ही तुमची त्वचा खराब होण्यापासून रोखू शकता.
फेशिअल केल्यानंतर किमान 4 ते 6 तास चेहरा धुवू नये. तुम्हाला तुमचा चेहरा धुण्याची गरज असल्यास, चेहऱ्यावर फक्त पाणी शिंपडा आणि तुमचा चेहरा स्वच्छ करा. तसंच लक्षात ठेवा की टॉवेलने त्वचा जास्त घासू नका आणि स्क्रब करणेही टाळा. असे केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि फेशिअल चा प्रभाव कमी होतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









