आर्थिक सुरक्षितता व विश्वासार्हता जी देते उज्ज्वल भविष्य
प्रतिनिधी/बेळगाव
तरुण भारत सौहार्द सहकारी संघ नियमित ग्राहकांच्या वाढत्या विश्वासाला पात्र ठरत असून अधिकाधिक ठेवीदारांचे आर्थिक गुंतवणूक केंद्र ठरत आहे. सातत्याने ग्राहकोपयोगी योजनांचा विचार करणाऱ्या तरुण भारत सौहार्द सहकारीला मिळणारा भरघोस प्रतिसाद तिच्या प्रगतीचे निदर्शक ठरत आहे.
सध्या ‘वर्धिष्णू ही मुदतठेव योजना’, ‘लक्ष्मीवृद्धी पुनर्ठेव योजना’, ‘आनंदवर्धिनी मासिक उत्पन्न योजना’, ‘सुखदा रिकरिंग योजना’ तसेच 78 महिन्यात शतप्रतिशत ही दामदुप्पट योजना अशा विविध उपयुक्त योजनांतून ठेवीदार सुरक्षित व आकर्षक व्याजदराद्वारे आपली नियोजित उद्दिष्टे गाठू शकणार आहेत.
वर्धिष्णू या योजनेंतर्गत एका वर्षासाठी 9 टक्के, दोन वर्षांसाठी 10 टक्के, तीन वर्षांसाठी 10.50 टक्के तसेच लक्ष्मीवृद्धी पुनर्ठेव योजनेंतर्गत एका वर्षासाठी 9 टक्के, दोन वर्षांसाठी 9.50 टक्के, तीन वर्षांसाठी 10 टक्के व्याजदर व ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याजदराचाही लाभ उठविता येतो.
अधिक माहितीसाठी तरुण भारत सौहार्द सहकारी संघ नियमित, 3524, नार्वेकर गल्ली, बेळगाव, फोन 0831-2424777 किंवा मोबाईल क्रमांक 9108540877 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









