बेळगाव : गणेशोत्सवापूर्वी महानगरपालिकेतर्फे विसर्जन मार्गांवर रविवारी सकाळी ख•dयांमध्ये तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. परंतु निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे ख•dयांमध्ये भरण्यात आलेले काँक्रीट गणरायाच्या आगमनापर्यंत टिकेल का? याची शाश्वती नाही. त्यामुळे ही डोळेझाक नेमकी कशासाठी, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. बेळगावमध्ये मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होत असतो. कर्नाटकात सर्वात मोठा गणेशोत्सव बेळगावमध्येच होतो. त्यामुळे यावर्षी बेळगाव महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवासाठी भरघोस निधी जाहीर करण्यात आला आहे. रस्त्यांची दुरुस्ती, विसर्जन तलावांची स्वच्छता, साफसफाई, कृत्रिम तलाव यासाठी निविदाही काढल्या. परंतु ख•s बुजविण्यासाठी घालण्यात आलेले काँक्रीट हे निव्वळ डोळेझाक असल्याचे शहरवासियांच्या समोर येत आहे. रविवारी सकाळी रामदेव गल्ली व परिसरात ख•dयांमध्ये काँक्रीट भरण्यात आले. ख•dयांमध्ये ओतण्यात आलेले काँक्रीट वाहनांची ये-जा सुरू असल्याने काही वेळातच निघून गेले. त्यामध्ये वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने गणरायाच्या आगमनापर्यंत तरी काँक्रीट राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तात्पुरती मलमपट्टी करताना बेळगावकरांची डोळेझाक करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सव 10 दिवस साजरा होणार असल्याने तोपर्यंत रस्त्यांवर पुन्हा ख•s पडतील. त्यामुळे महापालिकेच्या भरघोस निधीचा उपयोगच काय? असा प्रश्न गणेशभक्तांमधून उपस्थित केला जात आहे.
Previous Articleदहावी निकाल वाढीसाठी खात्याकडून प्रयत्न
Next Article ‘बागायती’साठी उभारणार शीतगृह
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









