बेळगाव : शनिमंदिर समोर बसविण्यात आलेल्या पेव्हर्सच्या चोहोबाजूंनी धोकादायक चरी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे याची दखल घेत नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी ही बाब मनपाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार गुरुवार दि. 30 रोजी धोकादायक चरींमध्ये डांबर टाकण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शनिमंदिर समोरील रस्त्यावर काही दिवसांपूर्वी पेव्हर्स बसविण्यात आले होते. मात्र, यावरून वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामुळे पेव्हर्सच्या चोहोबाजूने धोकादायक चरी निर्माण झाल्या होत्या. त्यामध्ये शालेय विद्यार्थी व वाहनचालक धोकादायक प्रवास करत होते. त्यामुळे त्या चरींमध्ये काँक्रिट किंवा डांबर घालण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. ही बाब गांभीर्याने घेत नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी मनपाकडे पाठपुरावा केल्याने गुरुवारी सदर ठिकाणी डांबर घालण्यात आला. यावेळी समाजसेवक सिद्धार्थ भातकांडे व इतर नागरिक उपस्थित होते.
Next Article निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनमधील फरक द्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









