नवी दिल्ली : बाटला हाउस एन्काउंटर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आरिझ खानच्या मृत्युंदडाला गुरुवारी जन्मठेपेत बदलले आहे. दिल्ली पोलीस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांच्या हत्येवरून आरिझ खानला यापूर्वी मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल आणि अमित शर्मा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी खानला दोषी ठरविण्याच्या सत्र न्यायालयाचा आदेशाला कायम ठेवले आहे. मार्च 2021 मध्ये सत्र न्यायालयाने आरिझ खानला मृत्युदंड सुनावला होता. हे प्रकरण रेयरेस्ट ऑफ रेयर म्हणजेच दुर्मिळातील दुर्मीळमध्ये मोडत असल्याचे सत्र न्यायालयाने म्हटले होते. इंडियन मुजाहिदीनचे दोन दहशतवादी आतिफ अमीन आणि मोहम्मद साजिद यांना 2008 मध्ये बाटला हाउस एन्काउंटरमध्ये ठार करण्यास पोलिसांना यश आले होते. परंतु यादरम्यान पोलीस निरीक्षक एम.सी. शर्मा यांना जीव गमवावा लागला होता. या एन्काउंटरवरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील झाले होते.
Previous Articleकॅनडा जी-20 परिषदेला अनुपस्थित राहणार
Next Article हिंसा रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









