बेळगाव : अनगोळ येथील मारुती गल्ली काळा तलावाच्या काठावर असलेला श्री रामलिंग देवस्थानाचा परिसर गेल्या काही दिवसांपासून अंधारात आहे. अनगोळ मारुती गल्ली येथील मागील बाजूस असलेल्या या जागृत मंदिराच्या बाजूने रस्ता डांबरीकरण केला आहे. तसेच रस्त्याच्याकडेला विद्युत दिव्यांचे खांब घालण्यात आले आहेत. पण या खांबावरील विद्युत दिवे हे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने संपूर्ण मंदिर परिसर तसेच तलावाच्या काठावर अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. संपूर्ण परिसर तलावाजवळ असल्याने सरपटणारे प्राणी या ठिकाणी वावरत असतात. तर मंदिराच्या मागच्या बाजूला लागून रहिवासी घरे आहेत. त्या ठिकाणी नागरी वसती आहे. लहान मुले, महिला या ठिकाणी राहात असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका संभवतो. तसेच रात्रीच्यावेळी या भागात अंधाराचा फायदा घेऊन गैरप्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. रामलिंग मंदिरात ठेवण्यात आलेली दानपेटी गेल्या काही महिन्यांपूर्वी अंधाराचा फायदा घेऊन दोन ते तीनवेळा भुरट्या चोरांनी फोडून त्यातील रोख रक्कम लांबविली आहे. तरी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परिसरातील रस्त्यावरील विद्युतदिवे सुरू करण्यात यावेत, अशी मागणी येथील नागरिक तसेच भक्तांच्यावतीने करण्यात येत आहे.
Previous Articleबेळवट्टी, इनाम बडस-बाकनूर रस्त्याला वाली कोण?
Next Article किराणा खरेदीनंतर दुकानदारांची फसवणूक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









