केएससीए 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए 16 वर्षाखाली आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून आनंद क्रिकेट अकादमी संघाने हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 178 धावांनी, विलास बेंद्रे क्रिकेट अकादमी संघाने जॉन पँथर संघाचा 9 गड्यांनी तर सीसीके संघाने भटकळ स्पोर्ट्स क्लबचा 166 धावांनी पराभव करून प्रत्येकी चार गुण मिळविले. श्रेयांशू ए. एन., शन्मुक, लाभ वेर्णेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पहिल्या सामन्यात जॉन पँथर क्रिकेट अकादमी गदग संघाने प्रथम फलंदाजी करताना 34.5 षटकात सर्व बाद 82 धावा केल्या. त्यात कीर्तीराजने 3 चौकारासह 15 तर अभिषेकने 12 धावा केल्या. विलास बेंद्रेतर्फे रिहान जमादारने 20 धावात 4, श्रेयांशू ए. एन. 5 धावात 2, रेहान तांबिटकरने 15 धावात 2 तर प्रज्ज्वल बुराजी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विलास बेंद्रे अकादमीने 12.2 षटकात एक गडी बाद 84 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात श्रेयांशू ए. एन. 13 चौकारासह नाबाद 71 धावा केल्या. गदगतर्फे अभिषेक शिगरीने एक गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात सीसीके संघाने प्रथम फलंदाजी करताना 41.4 षटकात सर्व बाद 214 धावा केल्या. त्यात एस. शन्मुकने 8 चौकारासह 47, सुजन हुली 4 चौकारासह 24, मयुर भागोजीने 3 चौकारासह 26, तर साईकुमारने 10 धावा केल्या. भटकळतर्फे इराप्पा गाणीने 25 धावात 5 तर अफरोज व याशीश नाईक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भटकळ संघाचा डाव 14.2 षटकात 49 धावात आटोपला. त्यांच्या संकेत राठोडने 15 धावा केल्या. सीसीकेतर्फे किशब जी. ने 2 धावात 4, अभिषेकने 26 धावात 2, सुजानने 7 धावात 2 तर समर्थने एक गडी बाद केला.
तिसऱ्या सामन्यात आनंद अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 42 षटकात 2 गडी बाद 267 धावा केल्या. त्यात लाभ वेर्णेकरने 15 चौकारासह नाबाद 119 धावा करून दमदार शतक झळकविले. त्याला ओम जकातीने 11 चौकारासह 71 तर निलेश आर. ने 4 चौकारासह 44 धावा करून सुरेख साथ दिली. हुबळीतर्फे विश्वनाथ व गजेंद्र यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघाचा डाव 32.3 षटकात 89 धावात आटोपला. त्यात अक्षय एन. ने 2 चौकारासह 25, फुरखान जी. ने 4 चौकारासह 23, विश्वनाथने 3 चौकारासह 17 धावा केल्या. आनंदतर्फे सुप्रित गेंजीने 25 धावात 4, लक्ष वेर्णेकरने 21 धावात 3, सुमित के. व तनिष्क जैन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.









