आंबोली घाटात मुख्य दरडीच्या खालील बाजुस दोनशे फूट खोल दरीत मृतदेह आढळला होता . आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास आंबोली रेस्कू टीमच्या मदतीने आंबोली पोलीसांनी दरीतून हा मृतदेह वर काढला. यावेळी आंबोली रेस्कू टिमचे सदस्य ग्रामस्थ ,आंबोली पोलीस , सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक , ऊप निरीक्षक, हवालदार, यावेळी हजर होते. मृतदेह वर काढल्या नंतर तो तपासण्यात आला यावेळी त्याच्या डोक्याला मार लागल्याच्या खूणा दिसत होत्या. तसेच मृतदेह ऊन्हातच असल्याने हाताची आणि पायाची चामडी निघाली होती. चेहरा काळपट पडला होता. सदर व्यक्तीचे वय साधारण पस्तीस ते चाळीस वर्षे असणार असा अंदाज आहे. मृतदेह परप्रांतीय कामगाराचा असल्याचा अंदाज त्याच्या कपड्यावरून दिसून येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगेली प्राथमिक आरोग्य केद्रात पाठविण्यात आला असून शवविच्छेदनानंतरच त्याचा मृत्यु कसा झाला समजू शकेल असा अंदाज आहे. या घटनेमुळे आंबोली पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीये . या प्रकरणात नेमकं त्या व्यक्तीसोबत काय झालं ? की घातपात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Previous Articleवीजमीटर नावावर करण्यासाठी हेस्कॉममध्ये गर्दी
Next Article गरिबांचा तांदूळ अडविल्याबद्दल काँग्रेसचा मोर्चा









