पणजी : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, जरी धोका नसला तरी काळजी घ्यायला हवीच. लग्नसोहळे, सार्वजनिक कार्यक्रम, वाढदिवस आदी ठिकाणी नागरिकांनी हजेरी लावताना तोंडाला मास्क परिधान केल्यास आणि सॅनिटायझरचा वापर केल्यास कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात राहील, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले. डॉ. साळकर यांनी सांगितले की, कोविड़ब]िधत ऊग्णांचा आकडा हा शंभर पार झालेला आहे. ऊग्ण दगावण्याची भीती नसली तरी सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. कारण शनिवारी तब्बल 22 ऊग्णांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा हा वाढत आहे. ज्या व्यक्तींना ताप, सर्दी, खोकला किंवा श्वसनाचे आजार असतील, अशांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळावेतच, असे ते म्हणाले. शाळा, माध्यमिक विद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यादृष्टीकोनातून आत्तापासूनच सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. धोका वाढू नये, यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे. किडनीचे आजार किंवा हृदयविकार असलेल्या नागरिकांनी वेळीच औषधोपचार घ्यायला हवेत, असेही साळकर म्हणाले.
Previous Articleखंडणीप्रकरणी आमदार मायकल लोबोंचे घुमजाव
Next Article तब्बल 2.50 कोटीच्या योजनेकडे आमदारांचे दुर्लक्ष
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









