बेळगाव : काही दिवसांपूर्वी सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी येथे मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी पाण्याच्या टाकीमध्ये हिंदू संघटनेच्या कांही कार्यकर्त्यांनी विष मिसळले होते. ही घृणास्पद घटना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखी आहे. यामुळे यातील संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शहर एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 14 जानेवारी रोजी हुलीकट्टी येथील सरकारी शाळेत कार्यरत असणारे मुख्याध्यापक अल्पसंख्याक असल्याने त्यांची बदली करावी, या मागणीसाठी हिंदू कार्यकर्त्यांनी मुलांचा जीव टांगणीला लावत पाण्याच्या टाकीत विष मिसळले. मात्र या घटनेत सदर मुख्याध्यापकांना ओढण्याचा प्रयत्नही कार्यकर्त्यांकडून झाला. या घटनेमुळे एकप्रकारे देशाच्या अखंडतेवरच घाव घालण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे संबंधितांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी इम्रान पिरजादे, शाहरूख पटेल, शाहिदखान पठाण, ललितखान पठाण, बुरान गोवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleचव्हाट गल्लीचा गौरवशाली इतिहास अन् परंपरा
Next Article कत्तलखाना चालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









