बेळगाव : गेल्या दोन-तीन दिवसांपासून बेळगावसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून शेतजमिनीत पाणीच पाणी झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे कृषी खातेही अलर्टमोडवर आले असून लागलीच पाहणीदौरा सुरू केला आहे. कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी बेळगाव तालुक्यातील विविध भागांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी शेतीची मशागत करून घेतली. यानंतर पेरणीला पोषक असा पाऊस झाल्याने भाताची पेरणी केली होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतजमिनीत पाणीच पाणी झाले आहे. यामुळे पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी काही दिवस लागणार असून पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी कृषी खात्याचे उपसंचालक एच. डी. कोळेकर यांनी यळ्ळूर, वडगाव, शहापूर, खासबाग, माधवनगर आदी ठिकाणी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची माहिती घेतली. कृषीतर्फे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले.
Previous Articleगुरुवारी घेतली पावसाने विश्रांती
Next Article कॉलेज रोडवरील गटारीची नगरसेवकाकडून सफाई
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









