खानापूर : काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी प्रचारात मुसंडी मारली असून तालुक्याच्या पश्चिम भागात प्रत्येक गावात मतदारांशी संपर्क साधून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचारादरम्यान आमटेतील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अंजली निंबाळकर यांनी या सर्व युवा कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तालुक्यातील विकास व पश्चिम भागातील समस्या सोडविण्यासाठी डॉ. निंबाळकर यांनी घेतलेले परिश्ा़dरम या सर्वांचा विचार करून आमटे येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पश्चिम भागातून काँग्रेसला मतदानात आघाडी देण्याचा निश्चय या कार्यकर्त्यांनी केला. विकास व सामाजिक कार्य लक्षात घेऊन आमटेतील तऊण कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉ. निंबाळकर यांनी काँग्रेस पक्षात त्यांचे स्वागत केले. य् ाावेळी डॉ. निंबाळकर म्हणाल्या, राज्यात कर्नाटक काँग्रेस सत्तेत आल्यानंतर चार गॅरंटीची निश्चित पूर्तता करण्यात येणार आहे. यात तऊणांसाठी रोजगार भत्ता, रेशनकार्डवर मोफत तांदूळ प्रत्येक घराला मोफत वीज यासह सर्वसामान्यांच्या हिताचे उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
Previous Articleअलतगे श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सव आजपासून
Next Article डॉ.रवी पाटील यांचा सदाशिवनगर परिसरात प्रचार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









