खानापूर : खानापूर ताराराणी हायस्कूल येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. शाळेचे विद्यार्थी स्वप्नील गावकर, सानिका कोवाडकर, सानिका गावकर, मनुजा गावकर व संजना पाटील या पाच विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत यश मिळविल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अबनाळी शाळेतील गावचे विद्यार्थी गेली दहा वर्षे सतत जिल्हा तसेच राज्य स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. या विशेष कामगिरीबद्दल खानापूर तालुक्याचे बीईओ पी. रामाप्पा, बीआरसी अधिकारी ए. आर. अंबगी, तालुका क्रीडाधिकारी सुरेखा मिरजी, तालुका अक्षरदासोह अधिकारी महांतेश कित्तूर, शिरोली केंद्राचे सीआरपी बी. ए. देसाई यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक रमेश कवळेकर, सहशिक्षक विजय पाटील, समीक्षा कवळेकर, वैशाली पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष गंगाराम गावकर, उपाध्यक्षा सपना गावकर यांनी अभिनंदन केले आहे.
Previous Articleबेळगावात अॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानासाठी दिल्लीत मागणी
Next Article उचगावातील तेरसे दाम्पत्य खरोखरच महान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









