माशेल : माशेल येथील गोवा बागायतदार सोसायटीच्या बाजूला असलेल्या ओहोळात जलवाहिनीला गळती लागून दिवसाकाठी शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. दीड महिन्यापासून हा प्रकार सुरु आहे. मात्र अद्याप तिची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. माशेल भागात सध्या पाण्याचा तुटवडा असून दोन दिवसाआड नळाला पाणी येते. एका बाजूला नागरिकांना पाण्यासाठी हाल सोसावे लागतात तर दुसऱ्याबाजूने अशा प्रकारे पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराबद्दल काही नागरिकांनी पाणी विभागाला कल्पना दिलेली आहे. पंचायतीलाही कळविण्यात आले आहे. तरीही अद्याप या गळती लागलेल्या जलवाहिनीकडे कुणीही लक्ष घातलेले नाही. या ओहोळात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असून आसपासच्या आस्थापनातील सांडपाणीही सोडले जात आहे. जलवाहिनीतून नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा होत असल्याने हे पाणी दुषित होऊन आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे नागरिकांनी सांगितले.
Previous Articleजागतिक संकेतामुळे सेन्सेक्स नुकसानीत
Next Article राष्ट्रीय बजरंग दल गोवातर्फे पंतप्रधानांना निवेदन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









