खानापूर : खानापूर-हल्याळ रस्त्यावर मलप्रभा नदीवरील नव्या पुलाशेजारी मंगळवारी दुपारी वृक्ष कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे. खानापूर-हल्याळ-गोवा रस्त्यावर मलप्रभा नदीवरील नवीन पुलाशेजारी जॅकवेलसमोर सावरीचे मोठे झाड पावसामुळे कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक जवळजवळ चार तास ठप्प झाली होती. तसेच या मार्गावरील वाहतूक जांबोटी क्रॉसवरून बेळगाव-गोवा रस्त्यावर वळविण्यात आली होती. पडलेले झाड कुणी काढायचे, यावरून बराचकाळ एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात येत होती. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो म्हणून वनविभागाने त्यांच्याकडे झाड काढण्यासंदर्भात बोट दाखविले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे असून ती जबाबदारी त्यांच्यावर येते, असे सांगून त्यांनीही हात वर केले. त्यामुळे वनखात्याने दुपारनंतर झाड काढण्यास प्रारंभ केला. क्रेनच्या साहाय्याने झाड बाजूला सारून रस्ता मोकळा करण्यात आला. तसेच ज्या पुलावर झाड पडले तो पूल साठ वर्षांपूर्वीचा असून या पुलाचे कठडे तुटल्यामुळे पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. संबधित खात्याने याकडे तीन वर्षांपासून दुर्लक्ष केले असून पुलाच्या दोन्ही बाजुला असलेले कठडे बांधणे गरजेचे आहे.
Previous Articleपिके वाया गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









