सकाळपासून पहाटेपर्यंत देवीच्या नामाचा गजर : आजपासून चार दिवस होणार देवीचा कौलोत्सव

रविराज च्यारी /डिचोली
‘श्री देवी लईराई माता की जय’च्या अखंड गजरात शिरगावातील देवी लईराईच्या जत्रोत्सवासाठी असह्य उकाड्यातही जमलेल्या भाविकांच्या गर्दीने गाव अगदी फुलून गेले. भाविकांनी व धोंडगणांनी सकाळपासूनच शिरगावात मोठी गर्दी केली होती. दुपारी 12 वा.च्या सुमारास मयेतील चौगुले मानकरी देवीस कवळास घेऊन आल्यानंतर जत्रोत्सवाला प्रारंभ झाला. ढोलावर काठी पडताच शिरगावातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले आणि धोंडगण हातातील वेतकाठी हवेत फिरवत मंडपात थिरकू लागले. दिवसभर लाखो लोकांनी देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली, रात्री तर शिरगावात भाविकांचा महापूरच आला होता. धोंडगण आणि लोकांच्या साक्षीने आज मंगळवारी पहाटे देवी आपल्या धोंडगणांसह अग्निदिव्य मार्गक्रमण करून आपला पण पूर्ण करणार आहे. नंतर चार दिवस कौलोत्सव चालणार आहे. देवीचा कळस शिरगावातील घरांच्या अंगणात जाऊन त्या घरातील कुटुंबियांना व लोकांनाही कौलप्रसाद देणार आहे.

हजारो भाविक, धोंडगणांची उपस्थिती
सकाळी देवीच्या मंदिरात विविध धार्मिक विधी झाले. देवीच्या कळसातील तीर्थ गावातील प्रत्येक घरामध्ये वितरित करून गाव शुचिर्भूत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे असह्य कडक उकाड्यात मोठ्या संख्येने महिला, वृद्ध, तऊण याचबरोबर धोंडगणांनी उपस्थिती लावली होती. देवी लईराईला प्रिय असलेल्या मोगरीच्या कळ्यांच्या माळा हातात घेऊन देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
हर्रो… हर्रो… चा गजर
शिरगावातील देवी लईराईला मये गावातून कवळास आल्यानंतर शिरगावातील जत्रोत्सवाला प्रारंभ होतो. सकाळी साडे अकराच्या सुमारास मयेतील चौगुले मानकरी गावकरवाडा मये येथील देवी महामायाच्या मंदिरात जमा झाले. मंदिरात देवीला सांगणे घातल्यानंतर देवीचा कवळास घेऊन चौगुले मानकरी शिरगाव येथे जाण्यास निघाले. दु. 12 वा. च्या सुमारास मयेतील चौगुले मानकरी शिरगावातील मंदिरात दाखल होताच येथील वातावरणात चैतन्य निर्माण झाले. तोच ढोलावर काठी पडायला सुरूवात झाली आणि हातात वेतकाठी धरलेले सर्व धोंडगण मंडपात हर्रो.. हर्रो.. च्या गजरात थिरकू लागले.
देवीची चिरा मु•ाr येथे रवाना
मयेतील चौगुले शिरगावात दाखल झाल्यानंतर शिरगाव येथील देवीचे चौगुले मानकरी यांनी देवीची उत्सवमूर्ती (चिरा) असलेली पेठ मंदिरात आणली. देवीच्या मंदिरात उत्सवमूर्ती सजविण्यात आल्यानंतर चिरा मोडाच्या डोक्यावर स्वार करण्यात आली. देवीला गाराणे घालताच वाजत गाजत धोंडगणांच्या साथीने नाचत चिरा मु•ाr येथे जाण्यासाठी रवाना झाली. वाटेत असंख्य भाविकांनी चिराचे दर्शन घेतले. चिरा मु•ाr येथे आपल्या आदिस्थानात दाखल झाल्यानंतर देवीचा मोठा जयघोष झाला. यानंतर सर्व धोंडगणांनी देवीच्या पवित्र तळीवर स्नान केले. यावर्षी धोंडगणांच्या तळीचे विस्तारीकरण करण्यात आल्याने धोंडगणांची चांगली सोय झाली. या कामामुळे धोंडगणांनी समाधान व्यक्त केले. येथे स्नान केल्यानंतर मु•ाr येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच होमकुंडाला प्रदक्षिणा मारल्या. मु•ाr येथे नव्यानेच धोंड म्हणून रूजू झालेल्या धोंडगणांना मानवून घेण्यात आले. सकाळीपासूनच राज्यातील विविध भागांमध्ये सोवळे व्रत पाळलेल्या असंख्य धोंडगणांनी शिरगावात उपस्थिती लावली होती. रात्री चिरा पुर्ववत देवीच्या मंदिरात दुपारी वाजत गाजत आपल्या मूळ आदिस्थानात आणण्यात आलेली चिरा देवीची उत्सवमूर्ती रात्री 8.30 वा. च्या सुमारास मोडाच्या डोक्यावर स्वार करून नाचत गाजत देवीच्या मुख्य मंदिरात आणण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. रात्री 11.30 वा. च्या सुमारास देवीचा मोगरीच्या कळ्यांनी सजविलेला कळस मोडपुरूषांच्या डोक्यावर स्वार करण्यात आला. जत्रोत्सवाचे गाऱ्हाणे घातल्यानंतर असंख्य धोंडगणांच्या वेतनृत्य आणि देवीच्या जयघोषात नाचत गाजत मंदिरातून बाहेर काढण्यात आला.
होमकुंडाला अग्नी
रात्री 12 वा. च्या सुमारास देवीचा कळस होमकुंडस्थळी दाखल होताच देवीच्या नामाचा मोठा गजर करण्यात आला. अगदी वातावरण प्रफुल्लित झाले होते. होमकुंडाला देवीने चंद्रज्योतीच्या सहाय्याने अग्नी दिला. होमकुंडाने पूर्णपणे पेट घेताच हा सारा परिसर अगदी प्रकाशमान झाला. होमकुंडाला अग्नी दिल्यानंतर लगेच देवी पवित्र तळीवर स्नानासाठी गेली. पवित्र तळीवर गेल्यानंतर देवीच्या कळसात तीन ओंजळी तळीतील पाणी घालण्यात आले. समवेत असलेल्या मोडपुरूष व इतर चौगुले मानकऱ्यांनी स्नान केल्यानंतर कळस मु•ाr येथे मूळ आदिस्थानात गेला. देवीचा कळस मु•ाr येथे दाखल होऊन मंदिरात स्नानापन्न होताच शिरगावात दाखल झालेल्या लाखोंच्या संख्येने धोंडगणांनी पवित्र तळीत स्नान केले. स्नान करून धोंडगणांनी मु•ाr येथे देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. मु•ाr येथे देवीचे दर्शन घेतल्यावर या धोंडगणांना देवीचा प्रसाद म्हणजेच मोगरचा कळा दिला जातो. तो कळा तोंडात धरून धोंडगण अग्निदिव्य पार करण्यासाठी रांगा करतात. पहाटे होमकुंडातील लाकडांचे निखारे झाल्यानंतर ते धगधगते निखारे एका बाजूला आणून त्यांचा थर तयार केला जातो. आणि या थरावरून सर्वप्रथम धोंडगण जातात. पहाटे देवीने अग्निदिव्य पार केल्यानंतर कळस चव्हाटा येथे नेऊन ठेवण्यात य् ाsईल.









