ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 दिवसांसाठी संचारबंदीची देखील घोषणा केलेली आहे. मात्र तरी देखील रूग्ण संख्या कमी होत नसल्याने, आता राज्यात कडक लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 58,924 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 351 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील बाधितांची एकूण संख्या 38 लाख 98 हजार 262 वर पोहोचली आहे. कालच्या एका दिवसात 52, 412 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 31 लाख 59 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.04 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.56 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 76 हजार 520 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 40 लाख 75 हजार 811 नमुन्यांपैकी 16.19 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 37 लाख 43 हजार 968 क्वारंटाईनमध्ये असून, 27 हजार 081 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.








