ऑनलाईन टीम / मुंबई :
विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले आणि पहिल्याच दिवशी महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यामध्ये वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरुन संघर्ष पाहायला मिळाला. वैधानिक विकास महामंडळाची न घोषणा करण्यावरून भाजपने ठाकरे सरकार हल्लाबोल केला. त्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरावरून आता माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ’12 आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध?,’असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.
वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देण्यावरून ठाकरे सरकार आणि विरोधी भाजप यांच्यात पहिल्याच दिवशी सामना रंगला. विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. राज्यपालांकडे प्रलंबित असलेली विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती झाली की, दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ दिली जाईल, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केले होते.
अजित पवारांच्या या मुद्द्यावरून आता माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
ते म्हणाले, 12 आमदार जाहीर होतील, तेव्हा वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा-विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा-विदर्भात आले, तर त्यांचे स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे. 12 आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??,” अशा आशयाचे ट्विट करत निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.








