सोलापुरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक कीट वाटप सुरू
सोलापूर : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ११५ गावांतील १५,११४ कुटुंबे पूरपरिस्थितीमुळे बाधित झाली. या कुटुंबांचे जीवनावश्यक साहित्य भिजल्यामुळे वापरण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आवश्यक मूलभूत व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले एकात्मिक कीट तयार करून पूरबाधित कुटुंबांना पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. कीटमध्ये एकूण २५ वस्तूंचा समावेश असून त्यामध्ये आठ मूलभूत वस्तू एका पिशवीत व १७ जीवनावश्यक वस्तू दुसऱ्या पिशवीत ठेवण्यात येणार आहेत. दोन्ही पिशव्या एकत्र करून एक मोठी पिशवी तयार करण्यात येणार आहे.
कीटमध्ये समाविष्ट वस्तू :
मूलभूत बस्तु (८) : टूथब्रश (२), दंतमंजन पुडी (१), पेस्ट (मध्यम-१), (मध्यम-१). खोबरेल तेल (२०० मि.ली. १), फणी (१), कंगवा (१), अंगाचे साबण (२- एक मोती साबण), कपडे धुण्याचा साबण (१), बिस्किट पुडे (३). जीवनावश्यक वस्तू (१७) : गव्हाचा आटा (५ किग्रॅ), साखर (५ किग्रॅ), चहापत्ती (२५० ग्रॅ), हरभरा दाळ (२ किग्रॅ), रवा (३ किग्रॅ), बेसन पीठ (१ किग्रॅ), स्वयंपाक तेल (२ किग्रॅ), मिठ (१ किग्रॅ), तिखट/गरम मसाला (१०० ग्रॅ), हळद/जीरे (१०० ग्रॅ), डालडा (५०० ग्रॅ), शेंगदाणे (१ किग्रॅ), पोहे (२ किग्रॅ), गूळ (१ किग्रॅ), काडीपेटी (१ मोठा बॉक्स), अगरबत्ती (१ लहान पाकीट), मेणबत्ती (१ मोठे पॅकेट). कीट वितरणासाठी ग्रामस्तरीय दक्षता समितीची रचना करण्यात आली आहे. यात ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी व कोतवाल हे सदस्य म्हणून नियुक्त असून त्यांच्या देखरेखीखाली कीट वाटप करण्यात येत आहे.
तहसील कार्यालयाचे समन्वय पुरवठा निरीक्षण अधिकारी संबंधित गावांचा रूट पुरवठादारास देतील. पुरवठादार त्या रूटनुसार प्रत्येक गावात कीट पोहोच करेल असे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ग्रामस्तरीय समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून तलाठी हे पुरवठादाराकडून कीट प्राप्त करून त्याची पोहोच घेतील व ती जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करतील. कीट पूरग्रस्तांना बाटप होईपर्यंत सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी पुरवठादाराची राहील. कीट वाटपाच्या पूर्वी गावात दवंडी देऊन लाभार्थ्यांना बाटपाची माहिती दिली जाईल.
(५ किग्रॅ), साखर (५ किग्रॅ), चहापत्ती (२५० ग्रॅ), हरभरा दाळ (२ किग्रॅ), रवा (३ किग्रॅ), बेसन पीठ (१ किग्रॅ), स्वयंपाक तेल (२ किग्रॅ), मिठ (१ किग्रॅ), तिखट/गरम मसाला (१०० ग्रॅ), हळद/जीरे (१०० ग्रॅ), डालडा (५०० ग्रॅ), शेंगदाणे (१ किग्रॅ), पोहे (२ किग्रॅ), गूळ (१ किग्रॅ), काडीपेटी (१ मोठा बॉक्स), अगरबत्ती (१ लहान पाकीट), मेणबत्ती (१ मोठे पॅकेट). कीट वितरणासाठी ग्रामस्तरीय दक्षता समितीची रचना करण्यात आली आहे. यात ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी व कोतवाल हे सदस्य म्हणून नियुक्त असून त्यांच्या देखरेखीखाली कीट वाटप करण्यात येत आहे.
तहसील कार्यालयाचे समन्वय पुरवठा निरीक्षण अधिकारी संबंधित गावांचा रूट पुरवठादारास देतील. पुरवठादार त्या रूटनुसार प्रत्येक गावात कीट पोहोच करेल असे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ग्रामस्तरीय समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून तलाठी हे पुरवठादाराकडून कीट प्राप्त करून त्याची पोहोच घेतील व ती जिल्हा पुरवठा कार्यालयास सादर करतील. कीट पूरग्रस्तांना बाटप होईपर्यंत सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी पुरवठादाराची राहील. कीट वाटपाच्या पूर्वी गावात दवंडी देऊन लाभार्थ्यांना बाटपाची माहिती दिली जाईल.








