बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. शहर व उपनगरांतील अनेक मंडळांनी गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर मेढ रोवून मंडप उभारण्यास सुऊवात केली आहे. मात्र, मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने मंडप उभारणीनंतरच्या कामात व्यत्यय येत आहे. सततच्या पावसामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली आहे. पावसाचा जोर 23 ऑगस्टपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने गणेश मंडळांना पाऊस थांबण्याची आणखी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. काही भागातील सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते पावसाला न जुमानता मंडप उभारणीसह पुढील कार्य करत आहेत.
Previous Articleकिणये ज्ञानेश्वर सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Next Article जुने बेळगावातील कलमेश्वर तलावाची स्वच्छता सुरू
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









