गुहागर :
मी राष्ट्रवादीत असताना मला तुमच्या पक्षात घ्या, कॅबिनेट मंत्रीपद मिळवून द्या. माझा मुलगा योगेश याला पदरात घ्या, अशी विनवणी करत रामदास कदम हे माझ्या दोनवेळा पाया पडले होते. त्यामुळे त्यांनी माझ्याविरोधात बोलताना विचार करावा, अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी कदम यांच्यावर टीका केली. तसेच या भागातील जे पदाधिकारी मला सोडून गेले, ते स्वार्थासाठी गेले असल्याचे सांगत त्यांचाही समाचार घेतला.
वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील हेदवी-हेदवतड येथील खारवी समाज भवन येथे आयोजित ठाकरे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, वेळणेश्वर व पडवे गटातील जिल्हा परिषद माजी सदस्य नेत्रा ठाकुर व महेश नाटेकर हे पदाधिकारी केवळ स्वार्थासाठी गेले आहेत. नेत्रा ठाकुर यांना जिल्हा नियोजन मंडळावर जायचे असल्याने त्यांनी हा खटाटोप केला आहे. शिवाय वेळणेश्वर गटात पुऊष आरक्षण असताना त्यांनी या गटात दावेदार उमेदवार असलेल्या विलास वाघे व समीर डिंगणकर यांनाही आपल्याबरोबर पक्षप्रवेश घडवून त्यांना राजकीय दृष्ट्या संपवले आहे. 2017मध्ये राष्ट्रवादीत मी असताना ठाकुर यांना मीच नियोजन मंडळावर घेतले होते. मात्र त्याचे श्रेय आता त्या पालकमंत्र्यांना देत आहेत, असे जाधव म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी वेळणेश्वरची खोती संपवली म्हणून आज मला संपवण्याचा प्रयत्न झाला असून कुणाचा बाप आला तरी मी संपणार नाही. उलट मीच त्यांना संपवेन. आज जो खारवी समाज त्यांच्याबरोबर गेला आहे, त्याच खारवी समाजाचे वेळणेश्वर येथील खारवी सभागृह पाडण्यासाठी नवनीत ठाकुर यांनी त्यावेळी संबंधित विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. आता पुन्हा सीआरझेडच्या नियमावलीमुळे हे सभागृह पाडण्याची नोटीस आली असून ते वाचवण्यासाठी मीच उपयोगी येणार असल्याचे स्पष्ट केले. साखरीआगर जेटीसाठी साडेआठ कोटीचा निधी मी मंजूर कऊन आणला आहे.
पडवे मोहल्ल्यात जाण्यासाठीच्या रस्त्याला कोणीही जागा देत नव्हते. मात्र मी तेथील हिंदू लोकांच्या विरोधात जाऊन तेथील रस्ता कऊन दिला. मी गुहागरमध्ये सुऊवातीला आलो तेव्हा येथे असा कोणता विकास होता, हे मला सोडून जाणाऱ्यांनी सांगावे. त्यामुळे सोडून जाणाऱ्यांना पश्चाताप होऊन माझ्याकडे पुन्हा यावेच लागेल, असाही विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा महिला संघटक अऊणा आंब्रे आदी उपस्थित होते.








