पणजी : गोव्यात देशांतर्गत आणि परदेशी पर्यटकांच्या संख्येत गेल्या सहा महिन्यात मोठी वाढ झाली आहे. या सहा महिन्यात 54 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे. त्यामुळे पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. विधानसभा अधिवेशनाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना मंत्री खंवटे म्हणाले, गोवा आता बारमाही पर्यटन केंद्र बनले आहे. चार्टर विमान ऑपरेटर्स अतिरिक्त विमानांसह गोव्यात येत आहेत. हिंटरलँड पर्यटनाला चालना देणे, पर्यटनाच्या विविध स्वरूपांचा विकास करणे आणि पर्यटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पर्यटन खात्याने विमान कंपन्या, हॉटेल व्यावसायिक आणि टूर ऑपरेटर विविध भागधारकांसह एकत्र बसून पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा आणि पॅकेजेस उपलब्ध करून देण्याचे धोरण राबवण्याचे उद्दिष्ट्या आहे. सांजाव आणि चिखलकाला यासारख्या उत्सवांना जागतिक पटलावर ओळख मिळत असून, दिवसेंदिवस राज्यातील पर्यटनक्षेत्रात सुधारणा होत आहे, असेही ते म्हणाले.
Previous Articleकँटरची ट्रकला धडक; बिजगर्णीचा तरुण जागीच ठार
Next Article ‘रेड अलर्ट’ जारी, मुसळधार पावसाची शक्यता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









