कणकुंबी : कणकुंबी भागात होत असलेल्या संततधार पावसामुळे येथील रामा गुंडू नाईक यांच्या हॉटेलवर विद्युतखांब पडल्याने रामा नाईक यांनी खानापूर हेस्कॉम व कणकुंबी ग्राम पंचायतीला नुकसान भरपाईसाठी निवेदन सादर केले आहे. गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे कणकुंबी पाणलोट क्षेत्रातील नदी-नाले प्रवाहीत झाले असून रविवार दि. 15 रोजी मध्यरात्री तीन, चारच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नाईक यांच्या हॉटेलला लागून असलेला विद्युतखांब पडल्याने हॉटेलचे पत्रे व इतर बरेच नुकसान झाले आहे. रविवारी आणि सोमवारी देखील हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी विद्युतखांब हटविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. हॉटेलवर खांब पडल्याने आपले आर्थिक नुकसान झाले असून हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक सहकार्य करावे, अशा मागणीचे निवेदन खानापूर हेस्कॉम खात्याच्या अधिकाऱ्यांना व कणकुंबी ग्राम पंचायतीला देण्यात आले आहे.
Previous Articleपावसाने उघडीप दिल्यामुळे बटाटा, रताळी लागवडीला जोर
Next Article अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









