बेळगाव : मागील शैक्षणिक वर्ष संपून नुकताच निकाल देण्यात आला. यामुळे पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी तसेच नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. शाळांचे प्रवेश अर्ज घेण्यासोबतच काही शाळांनी विद्यार्थी व पालकांची मुलाखत आयोजित केली आहे. यामुळे पालकांना त्या मुलाखतीची तयारी करावी लागत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांचे निकाल बुधवार दि. 9 रोजी जाहीर झाले. काही विद्यार्थी शाळा बदलणार असल्याने नवीन प्रवेशासाठी शाळांमध्ये धावपळ सुरू आहे. एलकेजी-युकेजी वर्गांच्या प्रवेशासाठी चार महिन्यांपूर्वीच अर्ज स्वीकृती करण्यात आली. परंतु, आता पहिली ते नववीचे प्रवेश करून घेतले जात आहेत. प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालक शाळांवर दाखल होत आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असल्याने अर्ज स्वीकारून ते भरून देण्यासाठी पालकांची तारेवरची कसरत सुरू आहे. इंग्रजीसोबतच मराठी व कन्नड शाळांमध्येही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
Previous Articleकामगारदिनी सफाई कामगार होणार सेवेत कायम
Next Article शिवजयंती मंडळांची उद्या बैठक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









