कणकुंबी : कर्नाटक सरकार मलप्रभा आणि म्हादई नदीचे पाणी वळवून धारवाड, गदग जिल्ह्याला पुरविण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही नद्यांचे पाणी वळविण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. यात कणकुंबीजवळील कळसा नाला तसेच नेरसाजवळील भांडुरा नाला वळविण्यात येणार आहे. कळसा नाल्याचे काम कर्नाटक सरकारने सर्व नियम धाब्यावर बसून कालवा तयार केलेला आहे. याचपद्धतीने भांडुरा प्रकल्पाचेही काम हाती घेण्यात आले आहे. या विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि सर्वपक्षियांनी आवाज उठविला आहे. जांबोटी-कणकुंबी भागातील या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला असून आज बुधवारी होणाऱ्या बैठकीला कणकुंबी-जांबोटी भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहून आपला विरोध दर्शवावा, असे आवाहन जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई, अण्णासाहेब कुडतूरकर, लक्ष्मण कसर्लेंकर, सखाराम धुरी, नानू गावडे, नामदेव पाटील यांनी केले आहे.
Next Article पैसे परत न केल्याच्या रागातून खून
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









