भागलपूर : बिहारच्या नवगछियामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या दोन भाच्यांदरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एका भाच्याचा मृत्यू झाला, तर दुसरा भाचा आणि त्याची आई जखमी झाली आहे. पाण्यावरून झालेल्या वादात विश्वजीत आणि जयजीत यांच्यात गोळीबार झाला. या घटनेत गोळी लागल्याने विश्वजीतचा मृत्यू झाला. तर जयजीत आणि त्यांची आई हिना देवी जखमी झाली असून दोघांना भागलपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत विश्वजीत आणि जयजीत हे केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांचे भाचे आहेत. विश्वजीत आणि जयजीत हे जगतपूर गावात एकाच घरात राहत होते. विश्वजीत मोठा भाऊ तर जयजीत लहान भाऊ होता. दोघेही शेती करून उदरनिर्वाह करत होते. नळाच्या पाण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले, ज्यानंतर दोघांनी परस्परांना मारहाणही केली. जयजीत आणि विश्वजीतने परस्परांवर गोळीबारही केला, यातील विश्वजीतचा रुग्णालयात नेतेवेळी मृत्यू झाला. तर जयजीत गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी विश्वजीतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. दोन्ही भावांचे भांडण सुरू असताना आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हिना देवी यांच्या हाताला गोळी लागली असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.
Previous Articleहिरो मोटोकॉर्पला धक्का, 6 जणांनी दिला राजीनामा
Next Article गुरुवारीही शेअरबाजारात तेजीचे सत्र सुरुच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









