रत्नागिरी :
रत्नागिरी शहरात एकामागून एक घरफोडीच्या घटना समोर येत आहेत़ साळवी स्टॉप येथे घरफोडीच्या घटनेबरोबरच आता शहरातील जोशी पाळंद येथे चोरट्यांनी बंद घर फोडल्याचे समोर आले आह़े ही घटना 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 च्या सुमारास घडल़ी चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. परंतु कोणताही किंमती ऐवज त्यांच्या हाती लागला नाह़ी त्यामुळे चोरट्यांनी बेडऊमधील कपाट उचकटून आतील सामान अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले. या प्रकरणी अनिल आग्रे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल़ी
आग्रे हे शिक्षक असून ते 27 रोजी सकाळी शाळेवर गेले हेत़े दुपारी 1 च्या सुमारास ते घरी आले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा उचकटलेल्या स्थितीत दिसून आल़ा तसेच त्यांनी बेडऊममध्ये जावून पाहिले असता आतील लोखंडी कपाटाचे लॉक उचकटून आतील लॉकरही फोडलेला होत़ा कपाटामध्ये चोरट्यांच्या हाती किंमती ऐवज न लागल्याने चोरट्यांनी घरातील इतर सामानही अस्ताव्यस्त केल़े नुकतेच शहरातील साळवी स्टॉप येथे बंद घर चोरट्यांनी फोडून सुमारे 6 लाख ऊपयांचा मुद्देमाल चोऊन नेल़ा यानंतर चोरट्यांनी जोशी पाळंद येथे घर फोडल़े दोन्ही चोरीच्या घटना सारख्याच पद्धतीने झाल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे परजिह्यातील चोरट्यांच्या टोळीचे हे काम असावे, असे बोलले जात आह़े
- गस्ती पथके अलर्ट
दरम्यान चोरीचा प्रकार समोर येताच रत्नागिरी शहर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाल़ी तसेच श्वानपथकालाही येथे पाचारण करण्यात आले होत़े मात्र या ठिकाणी चोरट्यांचा कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाह़ी दोन्ही चोरीच्या घटनांनंतर पोलिसांच्या गस्तीपथकांना अलर्ट करण्यात आले आह़े जोशी पाळंद येथे झालेल्या चोरीच्या प्रकारात चोरट्यांना काहीच हाती लागले नसल्याचे सांगण्यात आले.








