पाटणा : बिहारमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार असल्याने आतापासूनच राजकीय वातावरण तापू लागले आहे. राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीवर दिल्लीच्या निवडणुकीचा कुठलाही प्रभाव पडणार नसल्याचा दावा केला आहे. आम्ही असेपर्यंत बिहारमध्ये भाजप सरकार स्थापन होणार नाही, जनता भाजपचा खरा रंग ओळखून असल्याचे लालूप्रसाद म्हणाले. तर लालूप्रसादांच्या दाव्याला भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. बिहारमध्ये लालूप्रसादांचे राजकारण संपले आहे. लालूप्रसाद स्वत:च्या परिवाराच्या व्यतिरिक्त कशाचाच विचार करत नाहीत. लालूप्रसाद हे स्वत:च्या परिवारातच अडकून पडले आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल यांनी केली आहे. बिहारमध्ये आता लालूप्रसाद यादवांची गरज नाही. लालूप्रसादांमुळे बिहारचे नाव देशात खराब झाले होते, असा आरोप उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी केला आहे. बिहारमध्ये सध्या संजद अन् भाजपचे युती सरकार सत्तेवर आहे. राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.
Previous Articleरॉयल इनफिल्डची तिमाहीत विक्रमी दुचाकी विक्री
Next Article अफगाणी कारचालकाने जर्मनीत निदर्शकांना चिरडले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









