बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवार दि. 11 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. आपल्या भेटीत मंत्री जारकीहोळी यांनी कर्नाटक राज्यातील रस्ते, सेतु व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर चर्चा केली. राज्यात लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या वाढत असल्याने अनेक शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वाहतुक कोंडीची समस्या दूर करणे, सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्यांचे रूंदीकरण, सेतू, उड्डाणपूल यांची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सादर होणाऱ्या प्रस्तावांना मंजुरी द्यावी, अशी मागणी मंत्री जारकीहोळी यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
Previous Articleबेळगाव-मिरज अनारक्षित एक्स्प्रेसला रेल्वे पॅसेंजरचा दर्जा द्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









