बेळगाव : शरीर, मन, बुद्धी, आत्मा परमात्मा यांचे मानसिक संतुलन चांगले असणे गरजेचे आहे. जसा सूर्य निरपेक्षपणे काम करतो, वेळेवर येतो व जातो, असेच आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार केल्यास शरीर निरोगी राहते, असे प्रतिपादन योग धाम प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक अनिल लोकूर यांनी केले. संत मीरा शाळेत रथसप्तमी निमित्त मार्गदर्शन करताना त्यांनी वरील विचार व्यक्त केले. शाळेच्या माधव सभागृहात अनिल लोकूर, फकीरापा यळ्ळूरकर, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, क्रीडा शिक्षक सी. आर. पाटील यांच्या हस्ते सरस्वती, भारतमाता, ओंकार प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी रथसप्तमीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. पाहुण्यांच्या स्वागतानंतर यळ्ळूरकर व लोकूर यांनी मंत्रासहित प्राणायाम व सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करवून घेतली. याप्रसंगी गायत्री शेंद्रे, धनश्री सावंत, शिवकुमार सुतार, नीला धाकलुचे, चंद्रकांत तुर्केवाडी, सुजाता होळकर, भारती बाळेकुंद्रीसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
Previous Articleअनगोळ येथे रविवारी भव्य जंगी शर्यत
Next Article आझाद गल्ली स्पोर्ट्स विजेता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









